मराठी अभिनय क्षेत्रातली अतिशय देखणी आणि कसदार अभिनेत्री म्हणजेच महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे. अभिनेत्री म्हणून ती नेहमीच चर्चेत असते. तसेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील कायम चर्चेत असते. लवकरच ती तीच्या एका आगळ्यावेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती नेहमीच तिच्या अभिनयाच्या जोराने प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. लवकरच तिची एन्ट्री एक मालिकेमध्ये होणार असून ती तिच्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षक देखील तिला मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
स्टार प्रवाहवरील “तुझेच मी गीत गात आहे” या मालिकेमध्ये उर्मिला कोठारे एन्ट्री करणार आहे. या मालिकेतील स्वराज म्हणजेच स्वरा व मल्हार यांच नात स्वराज समोर आले आहे. मल्हारच त्याचे वडील असल्याचे त्याला कळले आहे. खूप वर्षानंतर त्याला ही गोष्ट समजल्याने त्याला अतिशय आनंद झाला आहे. तुम्हीच माझे वडील आहात ही गोष्ट तो मल्हारला सांगू इच्छित होता. परंतु नियतीच्या मनात मात्र दुसरच काही तरी मान्य होते.
तो मल्हारला बाबा अशी हाक मारण्याआधीच त्याचा अपघात झाला व त्या अपघातात त्याने त्याचा आवाज गमावला. त्याच्या मनातील भावना तो मल्हार समोर कश्या व्यक्त करणार हे आत्ता मालिकेच्या पुढील भागात सांगितले जाईल. हे सर्व चालू असताना मालिकेत उर्मीलाची एन्ट्री होणार तिने या मालिकेमध्ये स्वराजच्या आईच म्हणजेच वैदेहीच पात्र साकारल होत. पण एका गंभीर आजारामुळे वैदेहीच निधन होत अस दाखवण्यात आल आहे. पण स्वराजच्या आठवणीने कधीकधी तीच प्रेक्षकांना दर्शन होत.
याच मालिकेमध्ये आत्ता ती एक नवीन भूमिकेमध्ये दिसणार असून मंजुळा सातारकर हिची भूमिका तिने साकारली आहे. तिचा हा अंदाज अतिशय वेगळ्या पद्धतीचा असणार आहे.
या नव्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, ‘तुझेच मी गीत गात आहेच्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होताना अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत मी वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी साताऱ्याकडची आहे.
हे देखील वाचा : अंकुशच्या पत्नीने ‘महाराष्ट्र शाहीर’ दरम्यानच्या अनेक गोष्टींचा केला खुलासा…
या भाषेचाही वेगळा गोडवा आहे. याआधी अश्या पद्धतीचं पात्र मी साकारलेलं नाही. या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचा लहेजा मला आत्मसात करता येतोय. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.’