बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत मन मोहून टाकणाऱ्या प्रेमकथा दुर्मिळ आहेत. इंडस्ट्रीमध्ये फुललेल्या आणि विरळ झालेल्या अनेक नात्यांपैकी एक अविस्मरणीय प्रेमकहाणी म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांची.
रवीना आणि अक्षय हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. या दोघांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या सिनेमात एकत्र काम केले होते. रवीना आणि अक्षय यांच्या अफेअर विषयी सर्वांनाच माहित आहे. दोघांचं अफेअर एकेकाळी बॉलिवूडच्या हॉट टॉपिकपैकी एक. अर्थात दोघांपैकी कोणीही याविषयी आतापर्यंत बोलले नव्हते.
पण अनेक वर्षांनी रवीना टंडन अखेर आपल्या एक्स बॉयफ्रेंडविषयी म्हणजे अक्षय कुमार विषयी बोलली आहे.
नुकत्याच एका मुलाखती दरम्यान रवीनाने यावर भाष्य केले आहे. रवीना म्हणाली की, “अक्षय आणि मी एकमेकांचा खूप आदर करतो. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. अजूनही आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत. प्रत्येकाचा आपला असा एक प्रवास असतो आणि आपण त्याचा मान राखून पुढे जायचं असतं. अक्षय हा आपल्या मनोरंजनसृष्टीचा भक्कम आधार आहे असं मला वाटतं.”
पुढे तिला शिल्पा आणि अक्षयच्या नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “काही गोष्टींमुळे आमच्यातलं नातं सुधारलं. काही अनुभवांमुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. शमिता आणि शिल्पा माझ्या पतीच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. चांगला आणि वाईट काळ आम्ही एकमेकांसोबत घालवतो.”
हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी साखरपुडाही केला होता. पण नंतर काही कारणाने त्यांचं लग्न मोडलं. यानंतर दोघांनी आपापला मार्ग बदलला.