गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कुणी लग्नाच्या वर्षभरात घटस्फोट घेतला तर, कुणी १०-१५ वर्षांचा संसार मोडला. आता आणखी एक अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याचं समोर येत आहे. ‘एक था दिल, एक थी धडकन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ईशा कोप्पीकर सध्या बरीच चर्चेत आली आहे.
१९९५ मध्ये ईशानं मिस इंडिया स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावी केलं होतं. या विजेतेपदामुळं ती साऱ्यांच्या नजरेत आली आणि एका रात्रीत स्टार झाली. ईशाने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले. ईशा कोप्पीकरने आपल्या अभिनयाने नेहमीच सर्वांना वेड लावलं. तर तिच्या सौंदर्यावर आजही अनेकजण फिदा आहेत.
२००९ मध्ये ईशाने व्यावसायिक टीमी नारंगशी लग्नगाठ बांधली. त्यांची दोघांची पहिली भेट एका जिममध्ये झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि त्या मैत्रीच रूपांतर प्रेमात झाले जिममध्येच त्यांचे प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. टीमी नारंग हॉटेलियर, बिझनेसमॅन आहे. तर ईशाने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांना नऊ वर्षाची रियाना नावाची मुलगी देखील आहे. ईशा आणि टीमी त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आनंदी होते.
पण हळुहळू त्यांच्यात खटके उडायला लागले. त्यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झालीत पण काही कारणांमुळे लग्नाच्या तब्बल १४ वर्षानंतर ईशाने टीमी नारंगशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नोव्हेंबर २०२३ मध्येच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया झाल्याच बोलले जात आहे. ईशा आणि टीमी यांच्यातील मतभेदामुळे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. दोघांनीही त्यांच नात वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी त्या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे आता ईशाने घर सोडले, असून ती आपल्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. ईशा आणि टीमी या कपलकडे आदर्श कपल म्हणून पाहिल जात होत. त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
याबाबत ईशाने मीडियाला आपली प्रतिक्रिया देतावेळी असे म्हटले की, “माझ्याकडे सध्या काहीही सांगण्यासारखे नाहीये. मला काही बोलायचे नाहीये. सध्या मला माझी प्रायव्हसी हवी आहे. तुम्हीही या गोष्टीची काळजी घ्याल अशी आशा आहे.” त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.