बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि तरुण अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. मागील काही महिन्यांपासून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. परंतु कार्तिक किंवा साराने कधीच त्यांच्या नात्याबद्दल ठामपणे सांगितले नाही.
‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटामध्ये सारा आणि कार्तिकने एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेअर्सची चर्चा रंगली होती. ‘लव्ह आज कल 2’ ने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण या लोकप्रिय शोमध्ये कार्तिक उपस्थित होता. आता करण जोहरने सारा आणि कार्तिकच्या ब्रेकअपची पुष्टी केली आहे. परंतु कार्तिकने यावर काहीच रिअॅक्शन दिली नव्हती.
View this post on Instagram
पण आता मात्र कार्तिकने मौन सोडले आहे. नुकतेच कार्तिकने आपल्या ब्रेकअप बद्दल एक खुलासा केला आहे. मात्र, कार्तिकने त्याची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी त्याने एका मुलाखतीत असे सांगितले की, गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून तो सिंगल आहे. जेव्हा कार्तिकला एका मुलाखतीत सांगण्यात आले की, ‘कॉफी विथ करण’ मध्ये दिलेल्या त्याच्या लव्ह लाईफबद्दलची त्याची पूर्वीची वाक्ये खोटी वाटतात, तेव्हा तो म्हणाला, ‘मी गेल्या दीड वर्षांपासून सिंगल आहे, त्याशिवाय मला काही माहीत नाही. कार्तिकने लगेचच आपले वाक्य बदलले. त्याला विचारण्यात आले की, आता तुझे फक्त तुझ्या कामासोबत नाते आहे? यावर उत्तर देताना कार्तिक म्हणाला की, ‘नाही असे नाही, पण मी सिंगल आहे आणि हेच सत्य आहे’.