इंडस्ट्रीमध्ये असे फार कमी कलाकार आहेत, जे प्रत्येक विषयावर कशाचीही पर्वा न करता आपलं मत मांडतात. असे अनेक कलाकार आहेत जे समोर येऊन प्रत्येक विषयावर आपलं मत मांडताना दिसून येतात. अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच, पण ती ज्याप्रकारे प्रत्येक विषयावर स्वतःच मत मांडत असते हे देखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. बॉलिवूडमध्ये अशीच एक दिग्गज व्यक्ती आहे, जी प्रत्येक विषयावर अगदी ठामपणे आपले मांडताना दिसून येते. ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक ‘जावेद अख्तर’(Javed Akhtar).
एक काळ असा होता जेव्हा सलीम-जावेद या जोडीने बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केले होते. त्यांच्या लेखनाचे सगळे फॅन होते. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला एकाहून एक असे अनेक हिट सिनेमे दिले. पण काही काळानंतर सलीम आणि जावेद यांची जोडी तुटली. सलीम हे इंडस्ट्री पासून लांब गेले, पण जावेद आजही इंडस्ट्रीमध्ये आहेत. जावेद अख्तर हे नेहमीच आपल्याला एखाद्या विषयावर अगदी परखडपणे आपलं मत मांडताना दिसून येतात. मग ते सिनेमे असो, बॉलिवूड मधील कलाकार असो किंवा एखादा सामाजिक विषय असो. प्रत्येक वेळी ते अगदी ठामपणे मत मांडतात. मागील काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी संदीप वांगा रेड्डी यांच्या ‘अॅनिमल’ या सिनेमावर सडकून टिका केली. त्यावेळी देखील जावेद अख्तर बरेच चर्चेत आले होते.
आता पुन्हा एकदा जावेद अख्तर हे एका नवीन विषयावर बोलताना दिसून आले आहेत. यावेळी त्यांनी युनिफोर्म सिव्हील कोड (UCC) म्हणजेच ‘समान नागरी संहिता’ कायदा या विषयावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ फक्त मुस्लिमांवर टीका करण्यासाठी काही नियम लागू करणं योग्य नाही. चर्चा करुन काही नियम समान रुपाने सर्वांसाठी लागू करण्यात यायला हवेत. मी स्वतःसमान नागरी कायद्याचं पालन करतो. पण मुस्लिमांना बहुविवाह करता येऊ नये म्हणून समान नागरी कायद्याला पाठिंबा देत असेल तर हे चुकीचं आहे.”
पुढे ते म्हणाले’ “मुस्लिमांना चार बायका ठेवण्याचा अधिकार आहे म्हणून इतर लोकं जळतात. कायदा लागू करण्यासाठी हेच एक कारण आहे का? जर तुम्हाला देखील हा हक्क दिला गेल्यास काही अडचणी येणार नाहीत.”
त्यांच्या या अशा परखड मत मांडण्याच्या स्वभावामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.