सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या ‘रणबीर कपूर’च्या ‘अॅनिमल’ (Animal) ह्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ह्या सिनेमाने चाहत्यांचे मन जिंकली आहेच तसेच हा सिनेमा अनेक कलाकारांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवताना दिसून येत आहे.
अॅनिमल’ सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर ही वडील – मुलाच्या एक नाजुक अन तितक्याच विचित्र नात्याची गोष्ट आहे. जी रोमान्स, कॉमेडी अशी वेगवेगळी वळणे घेत प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचते. खरंतर अॅनिमलमधून संदीप यांनी भारतीय चित्रपटांना एक वेगळं वळण दिलंय असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ज्या गोष्टी दाक्षिणात्य चित्रपटांत आणि खासकरून तेलुगू चित्रपटात बेधडकपणे दाखवल्या जातात त्याच गोष्टी कोणताही आडपडदा न ठेवता संदीप यांनी हिंदी सिनेमात दाखवायचा प्रयत्न केला आहे.
हा सिनेमा अगदीच मसालेदार असून शिट्ट्या आणि टाळ्या येतील असे अनेक सीन्स या सिनेमात आहेत. या सिनेमामध्ये अनेक अॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. सिनेमा पाहून आल्यानंतर सिनेमाबद्दल प्रत्येकाने आपापली मते मांडली आहेत. तसेच साऊथच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्याने देखील सिनेमा पाहून आल्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमातील कलाकारांचे कौतुक केले आहे.
हा लाडका अभिनेता म्हणजे ‘अल्लू अर्जुन’ अल्लूने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अॅनिमलचं आणि सिनेमातील सर्वच कलाकारांचे कौतुक केले आहे. स्टोरी शेअर करत त्याने लिहिले की, “अॅनिमल सिनेमा पाहून मी थक्क झालो. अभिनंदन. रणबीर कापूरने त्याच्या अभिनयातून भारतीय सिनेमामध्ये परफॉर्मन्सची एक वेगळीच लेव्हल सेट केली आहे. खूपच प्रेरणादायी. तू पडद्यावर जी जादू केली आहेस ते पाहून मी नि:शब्द झालोय. रश्मिका खूप सुंदर आणि अप्रतिम, तुझा आत्तापर्यंतचा उत्तम परफॉर्मन्स. बॉबी देओल तुमच्या इम्पॅक्टफुल परफॉर्मन्सने सर्वानाच नि:शब्द केलंय. तुमचा खूप आदर वाटतो. अनिल कपूरजी तुमचा आणखी एक सहज आणि सुंदर अभिनय तुमचा अनुभवचं सर्वकाही सांगून जातो. तृप्ति डिमरी या नव्या मुलीने तर अनेकांच मन जिंकलंय असंच जिंकत राहा. सर्वच आर्टिस्ट आणि टेक्निशिन्सने उत्तम काम केलंय.”
तसेच पुढे लिहिले की, “दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा…द मॅन…तू तर सर्वच मर्यादा तोडल्या आहेस. तुझ्या या इटेन्स कामाची तुलनाच होऊ शकत नाही. तू पुन्हा एकदा सर्वांना अभिमान वाटेल असं काम केले आहेस. तुझ्या चित्रपटामुळे भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच पालटणार आहे. अॅनिमलने भारतीय सिनेमांच्या यादीतील क्लासिक सिनेमात प्रवेश केलाय.” त्यामुळे अल्लू अर्जुनने केलेल्या कौतुकाची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहे.