प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एक चांगला जोडीदार असावा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवावेत असं वाटत असतं. पण ज्या व्यक्तीवर आपल प्रेम असत ती व्यक्ती आपल्याला मिळेलच अस नाही. ज्या व्यक्तीवर आपल प्रेम आहे त्याच्याशी लग्न होणं किंवा त्याच्यासोबत आयुष्यभर राहणं सगळ्यांच्यात नशिबात नसतं. नात्यातील गुंता वाढत गेल्यानं अनेकदा जवळची नाती तुटतात.
अशी अनेक उदाहरणं तुम्ही आतापर्यंत पहिली असतील. त्यात सेलिब्रिटी म्हंटल की, त्यांच्या आयुष्याबद्दल ही चर्चा तर होणारच. त्यापैकीच एक म्हणजे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू. तब्बूने वयाची ४५ वर्ष ओलांडली असली तरीही ती आजही सिंगल आहे.
आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत तब्बुच नाव जोडलं गेल आहे. पण तिने याबाबत कधीच खुलासा केला नाही. दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून याच्या सोबत तब्बूच जवळजवळ १० वर्ष अफेअर होत. नागार्जून आणि तब्बूची ओळख एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झाली होती. मात्र नागार्जूनचं आधीच एक लग्न झाल होत, त्यांना त्याच्या पत्नी पासून विभक्त देखील व्हायचे नव्हते आणि तब्बू सोबत असलेले आपले नाते देखील त्यांना टिकवून ठेवाचे होते. मात्र हे सगळ तब्बूला मान्य नव्हते त्यामुळे त्यांचे नाते काही टिकले नाही.
तब्बूला बऱ्याचदा मुलाखतीत लग्नाबद्दल विचारण्यात आले आहे. एकदा तब्बूने उत्तर दिले ती म्हणाली, “ माझ्या वाढत्या वयामध्ये अजय माझा सगळ्यात जवळच्या मित्रांपैकी एक होता. माझा चुलत भाऊ समीर आर्य याच्या शेजारी अजय राहत होता. समीर-अजय यांच्या मैत्रीमुळे माझी आणि अजयची ओळख झाली. समीर-अजय तेव्हा माझ्या मागे मागे यायचे. माझ्या मागे कोणी मुलगा दिसला तरी त्याला धमकी द्यायचे. आज मी अजयमुळेच एकटी आहे.”
पुढे तब्बूला तू आतापर्यंत एखाद मुल का नाही दत्तक घेतलेस अस विचारण्यात आले त्यावर ती म्हणाली, “ मूल दत्तक घ्यायचे असते, तर मी खूप आधी घेतले असते, पण जर मुलाला आई-वडिलांचे प्रेम मिळणार नसेल, तर त्याला दत्तक घेऊन काही उपयोग नाही.”
त्यामुळे तब्बू आता लग्न करणार की नाही हा एक प्रश्नच आहे.