बॉलीवूडचा किंग खान रोमान्सचा बादशहा म्हणजेच शाहरुख खान. बॉलीवूड मध्ये जशी शाहरुखची रोमान्सचा बादशहा म्हणून ओळख आहे, तशीच खऱ्या आयुष्यात देखील काही कमी नाही. तो चित्रपटात जितका रोमॅंटिक दिसतो तितकाच खऱ्या आयुष्यात देखील असेल हे त्याच्या आणि गौरीच्या लव्हस्टोरी वरून समजते.
गौरी खान आणि शाहरुख खान यांनी २६ ऑगस्ट १९९१ मध्ये कोर्टात लग्न केले होते. त्यानंतर निकाह केला होता, आणि ऑक्टोंबर १९९१ मध्ये त्यांनी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्न केले. शाहरुख आणि गौरी हे बॉलीवूड मधले असे एकमेव जोडपं आहे, ज्यांनी एकूण तीन वेळा लग्न केले होते.
शाहरुख हा मुस्लीम असल्यामुळे गौरीच्या घरच्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. पण ते म्हणतात ना प्रेमामुळे जग देखील जिंकता येत याचं देखील असच काहीस झाले. पण नंतर घरच्यांच्या सहमतीने दोघांनी लग्न केले. या दोघांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख केवळ २६ वर्षांचा होता अन् गौरी ही फक्त २१ वर्षांची होती.
२००८ साली दिलेल्या एका मुलाखतीत गौरीने तिच्या लग्न बद्दल अनेक खुलासे केले. त्यातीलचं एक म्हणजे गौरीच्या घरच्यांनी लाग्नावेळी शाहरुखचं नाव बद्दल होत. गौरी मुलाखतीमध्ये म्हणाली, “आम्ही त्यावेळी लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यासाठी लहान होतो, आणि चित्रपटक्षेत्रात जाणाऱ्या एका दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी मी लग्न करणार होते. त्यावेळी आम्ही शाहरुखचं नाव बदलून अभिनव ठेवलं होतं जेणेकरून तो हिंदू असल्याचं समाधान आम्हाला मिळेल, पण ते खूप मूर्खपणाचं आणि बालिश वागणं होतं याची मला जाणीव नंतर झाली.”
पुढे ती म्हणाली, “ माझी तीनही मुलं दोन्ही धर्मांचं पालन करतात दिवाळीच्या दिवशी घरातील पूजा मी करते आणि इतर सगळे त्याप्रमाणे मला फॉलो करतात, ईदच्या दिवशी शाहरुख सगळी प्रार्थना करतो आणि आम्ही सगळे त्याचं अनुकरण करतो. आमच्या मुलांनी ही गोष्ट अगदी सहज स्वीकारली आहे, उलट याबाबतीत त्यांचा ओढा शाहरुखकडे जास्त असतो, तो जे सांगेल तसं ते करतात. त्यांना दिवाळी आणि ईद दोन्हीचं खूप कौतुक आहे.”
बॉलिवूडमध्ये या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून बघितलं जातं. दोघांचा धर्म जरी वेगळा असला तरी दोघांनी एकमेकांना तब्बल ३० वर्षं साथ दिली आहे.