मराठी मालिका या कायमच सर्वांच्या फेव्हरेट असतात. पण काही मालिका आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. अशीच प्रेक्षकांच्या रोजच्या नितीनियमावलीतील एक मालिका म्हणजे ‘रमा-राघव’ (Rama Raghav).
पौरोहित्य जपणारं कुटुंब आणि माॅर्डन कुटुंब जेव्हा लग्नाच्या नात्यामुळे कशी जोडली गेली, ते या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळालं. या मालिकेत रमा आणि राघवची प्रेमकहाणी जरी असली तरी त्यात कुटुंब देखील खूप महत्त्वाचा भाग म्हणून प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आला. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या रमा राघव या मालिकेला खूप सुंदर वळण आले. मालिका पुरता का होईना रीतसर म्हणजेच साऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या थाटामाटात प्रेक्षक लाडक्या कलाकारांच्या लग्नाची वाट पाहत होते अन् अखेर तो क्षण आलाच. सध्या मालिकेत रमा राघवच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. असंख्य वादळांना थोपवत हे लग्न आता निर्विघ्नपणे पार पडत आहे. या मालिकेत रमा (मनोरमा) म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आणि राघव म्हणजेच अभिनेता निखिल दामले यांनी खूपच सहज रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले.
View this post on Instagram
आता सध्या रमा-राघवचा लग्नसोहळा सुरु आहे. या सोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने हाताळण्यात आली आहे. प्रत्येक गोष्ट रीतीरीवाजाप्रमाणे अन् आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत मुरल्यासारखी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. तसेच रमाच्या अनोख्या मंगळसूत्रावर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या. तर आता त्यांचं लग्न झाल्यावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रेक्षकांच्या मनात बसलेली ही मालिका संपूच नये, असे अनेकांना वाटते. परंतू अद्याप मालिकेतील कोणत्याही कलाकाराकडून किंवा टीमकडून कोणत्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब केला गेला नाही. पण सध्या कलर्स मराठीवर नव्या दोन मालिकेंचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. ‘इंद्रायणी’ आणि ‘सुख कळले’ या आगामी मालिकांचे प्रोमो चांगलेच व्हायरल होत आहेत. तसेच इंद्रायणी या मालिकेच्या टायटल साँगचा ट्रेंड सुरु आहे. वाहिनीवरील अनेक कलाकार या गाण्यावर थिरकताना देखील दिसले.
एकीकडे मालिकेंचा बोलबाला सुरु असताना, दुसरीकडे मात्र या वानिनीवर मालिकेऐवजी बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस मराठी’चे ५ वे पर्व लवकरच घेऊन यावे अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. बिग बॉस मराठीचे शेवटचे पर्व २०२२ साली आले होते, आता २०२४ उगवला तरी प्रेक्षकवर्ग अजूनही पाचव्या पर्वाच्या प्रतीक्षेत आहे.