जगभरामध्ये प्रसिद्ध असणारा रिअॅलिटी शो म्हणजेच ‘ द कपिल शर्मा शो’ या शोबद्दल बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आमिर खान यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आमिर खान यांनी काही काळासाठी सिनेमांमधून ब्रेक घेतला आहे. पण ते नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. बऱ्याचदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील ते चर्चेचा विषय ठरतात. एका व्हिडीओ मध्ये त्यांनी कपिल शर्मा बद्दल नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
एका पंजाबी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्यासाठी आमिर व कपिल या दोघांनी हजेरी लावली होती. तेव्हा या शोमध्ये आमिरने कपिलवर असलेली नाराजी व्यक्त केली आहे. ‘कॅरी ऑन जट्टा ३’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात गप्पा मारताना आमिर कपिलवर व त्याच्या शोवर असलेली नाराजी व्यक्त करत म्हणाला की,
“मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी कपिल शर्माला फोन केला होता. मी आजकाल काम कमी करतोय. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतोय. मला कॉमेडी शो पाहायला खूप आवडतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी मी काही न काही विनोदी कार्यक्रम पाहून झोपतो. गेल्या काही महिन्यांपासून मी ‘कपिल शर्मा शो’ पाहतोय. मी या कार्यक्रमाचा खूप मोठा चाहता झालोय”, असं त्याने एका व्हिडीओ मध्ये म्हंटल आहे. पण ती नाराजी खरोखरची नसून तो एक मस्करीचा भाग आहे.
हे देखील वाचा : ‘बिग बॉस’ फेम स्पर्धक ‘खतरोंके के खिलाडी’ या शो मधून होणार बाहेर….
याव्यतिरिक्त त्याने अजून काही सांगितल आहे. पुढे तो म्हणतो, “माझ्या अनेक संध्याकाळ या कार्यक्रमामुळे खास झाल्या आहेत. त्यामुळे मी कपिलला फोन करून त्याचे धन्यवाद मानले. तुम्ही एवढ्या लोकांच मनोरंजन करताय त्यासाठी थॅक्यू. लोकांच मनोरंजन कारण ही फार मोठी गोष्ट आहे. आज तुला इथे पाहून मला खूप आनंद होतोय. मी तुझा सगळ्यात मोठा चाहता आहे. पण, अजूनपर्यंत तू मला तुझ्या शो मध्ये बोलवलं नाहीस? तू काही बोलायच्या आतच मी हे सांगतोय.”
View this post on Instagram
त्याच हे बोलन ऐकून कपिलने त्याला कार्यक्रमात येण्याची विनंती केली. “ज्या दिवशी तुम्ही आमच्या कार्यक्रमात याल तो दिवस आमच्यासाठी भाग्याचा असेल. कधीही आमिर भाईसोबत भेट होते ती अशी गडबडीमध्येच होते. बऱ्याचदा त्यांच्याशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, मी जरा घाईत आहे. नंतर आल्यावर बोलू. पण त्यानंतर ३ वर्षानंतर ते भेटतात”. असं कपिलने म्हंटल आहे.