बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते अरशद वारसी. अरशद यांचा जन्म १९६८ मध्ये मुंबईमध्ये झाला. लहानपणापासूनच ते अनेक अडचणींना सामोरे गेले आहेत. अगदी लहान वयातच त्यांच्या डोक्यावरून आई- वडिलांच्या मायेचे छत्र हरपलं होतं. त्यमुळे आई वडिलांच्या निधनानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.
आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षणही पूर्ण घेता आले नाही. त्यामुळे ते केवळ दहावीपर्यंत शिकले आणि त्यानंतर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून पैसे कमवण्यासाठी अवघ्या १७व्या वर्षी त्यांची धडपड सुरु झाली. सुरुवातीच्या काळात अरशद यांनी सेल्स मॅनचे ही काम केले होते. तेव्हा त्यांनी एका कॉस्मेटिक कंपनीची सौंदर्य प्रसाधने विकली होती. त्यांनतर त्यांनी अनेक लहानसहान कामे केली.
अरशद यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या १९९६ मधील ‘तेरे मेरे सपने’ या सिनेमापासून झाली. पण हा सिनेमा यशाच्या शिखरावर पोहोचण्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यमुळे आणखी कामं मिळवण्यासाठी ते वणवण फिरत होते. खूप कष्टाने त्यांना सिनेमे मिळाले, परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती २००३ साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमातून. त्यांचा हा सिनेमा इतका हिट ठरला की संपूर्ण सिनेसृष्टीत त्यांची सर्किट ही भूमिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे.
हे देखील नक्की वाचा : अभिनेत्री नम्रता संभेरावने व्यक्त केली ही इच्छा…