अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची मुलगी आहे.
स्वानंदी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री असून ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी विशेष ओळखली जाते. तसेच तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?’ या मालिकांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसून आली.
View this post on Instagram
२३ जुलै रोजी स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला. आत्ता मात्र तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता आहे. सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा सुरू असली तरी देखील स्वानंदीने मात्र अजूनही तिच्या लग्नाबद्दल काहीही खुलासा केला नाही. ती लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे ती म्हणाली होती.
स्वानंदीने जरी तिच्या लग्नाबद्दल काही खुलासा केला नसला तरी तिच्या वडिलांनी म्हणजेच उदय टीकेकरांनी मात्र स्वानंदीच्या लग्नाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. उदय टिकेकर म्हणाले की, “स्वानंदी व आशिष यांचं लग्न डिसेंबरमध्ये होईल. त्यांचं लग्न पुण्यातच होईल. आम्हीही पुण्याचेच आहोत आणि आशिषचं कुटुंबही पुण्याचं आहे. मी कामानिमित्त मुंबईत असतो. लग्नाचं ठिकाण पुणे असेल पण लोकेशन खूप सुंदर असेल.”
मुलीच्या लग्नाबद्दल त्यांच्या भावना स्पष्टपणे सांगत म्हणाले की. “मुलगी लग्न करून जाईल त्यामुळे भावूक होणार नाही. कारण आम्ही तिघेही आतापर्यंत एकमेकांपासून कामानिमित्त दूर जायचो. मी भावुक होतोय कारण ती खूप चांगल्या लोकांमध्ये जाणार आहे. मुलगा खूप चांगला आहे. बाप्पाची कृपा आहे की तिला चांगलं कुटुंब आणि चांगला मुलगा मिळाला आहे, त्यांनाही चांगली मुलगी मिळाली आहे. या गोष्टीमुळे मी खूप भावूक होत आहे,” असं उदय टिकेकर म्हणाले.
तर आता स्वानंदी आणि आशिषचे कुटुंबीय आणि त्या दोघांचा चाहतावर्ग देखील त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.