कुणी घर देता का घर? हे वाक्य वाचल्यावर किंवा ऐकल्यावर चटकन डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचा.
नाना पाटेकर यांनी १९७८ साली ‘गमन’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसह नाटकांत ही आपली अनोखी छबी उमटवली आहे. त्यांपैकी परिंदा, प्रहार आणि तिरंगा यांसारख्या हिंदी चित्रपट तर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘नटसम्राट’ हे त्यांचे मराठीमध्ये सर्वाधिक गाजलेले चित्रपट.
नशिबाने समोर मांडलेल्या आयुष्याच्या या खडतर प्रवासातून त्यांनी स्वतःला सावरत केवळ एक नट नाही तर या चित्रपटसृष्टीचा नटसम्राट म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
नाना पाटेकर यांचे योगदान फक्त मनोरंजन क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते सामाजिक कार्यातही ही बरेच कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेषतः मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी नाना पाटेकर यांनी २०१५ साली अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या मदतीने नाम फाउंडेशन संस्थेची स्थापना केली.
नाना पाटेकर यांना आतापर्यंत अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी तर विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
जगभर नाना म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांचे खरे नाव हे “विश्वनाथ पाटेकर” आहे.
तर अशा या अवघ्या मुलखाच्या नटसम्राटाला मानाचा मुजरा…