काही वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत गाजलेली अभिनेत्री म्हणजे ‘पूजा भट्ट’. १९९१ सालच्या ‘दिल है की मानता नही’ या सिनेमातून पूजाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर तिची लोकप्रियता आणि चर्चा जोरदार वाढत राहिली.
अनेक सुपरहिट सिनेमांनंतर ती अभिनयापासून दिग्दर्शन क्षेत्राकडे वळाली. तरी तिच्या अनेक चर्चा सुरूच होत्या जशी तिच्या लग्नाची चर्चा. त्यावेळी पूजाचं लग्न अभिनेता सोहेल खान सोबत होणार होतं मात्र. काही कारणास्तव ते लग्न पार पडले नाही.
त्याकाळचे पूजा आणि सलमान हे दोघेही लोकप्रिय कलाकार असे असले तरी त्या दोघांनी एकत्र कधीही काम केले नाही. याचे कारण म्हणजे सलमान खानचा भाऊ सोहेल खान, अशा बऱ्याच चर्चा होत्या. तर असेही दिसत होते की, पूजा सलमानचा प्रचंड तिरस्कार करत आहे.
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्टने सांगितले की, “असे अनेक लोक होते जे आमच्या नात्याच्या आड येत आहेत. पण याविषयी चर्चा करुन आता मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. आम्ही लग्नासाठी तयार आहोत. सोहेल त्याच्या करिअरची सुरुवात दिग्दर्शक म्हणून करत आहे आणि मलाही सेट होण्यापूर्वी आणखी दोन वर्ष तरी काम करायचं आहे. पण, आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे.”
पूजा आणि सोहेल या दोघांनी जरी लग्नाचा निर्णय घेतला असला तरी, त्यांचे हे लग्न मात्र सोहेलच्या वडिलांना म्हणजेच सलीम खान यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी या लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे या गोष्टीचा परीणाम असा झाला की, त्याचदरम्यान पूजा आणि सलमान पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमावर काम करत होते. या सिनेमाचं शुटींग अर्ध्याहून अधिक झाले होते. तर काही कारणांमुळे सिनेमाचं शूटिंगही थांबले होते. सलीम खान यांच्याकडून आलेला नकार पाहून सलमानने पूजालाचं समजवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यामुळे तिला त्याचा राग येऊ लागला. तेव्हापासून पूजाने सलमानसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.