बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंघ हा नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. वेगवेगळ्या भूमिका आणि हटके अंदाजामुळे तो नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. मात्र रणवीर आत्ता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
मालदीवच्या एका मंत्र्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे भारत आणि मालदीवमध्ये तणाव वाढत असताना, बॉलिवूड सेलिब्रिटी या द्वीपसमूहात एकता दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. सलमान खान, कंगना रणौत, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि श्रद्धा कपूर यांसारखे अभिनेते लोकांना बेटांचे सौंदर्य पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. रणवीर सिंग लक्षद्वीपला पाठिंबा देत देशांतर्गत पर्यटनाला चालना देणार्या कलाकारांमध्ये सामील झाला. मात्र, त्याने चुकून त्याच्या ट्विटमध्ये लक्षद्वीपऐवजी मालदीवचा फोटो शेअर केला. मात्र चूक लक्षात येताच त्याने ती पोस्ट डिलीट केली.
रणवीरने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, “यंदाच्या वर्षी आपली संस्कृती आणि आपल्या देशाविषयी अनेक गोष्टी जाणून घेऊया. आपल्या देशात असलेल्या अनेक गोष्टी या पाहण्यासारख्या आहेत आणि त्याशिवाय आपल्याइथे खूप सुंदर बीच आहेत.” पण हे सगळं बोलताना रणवीरकडून एक चूक झाली आणि त्यानं मालदीवचे फोटो शेअर केले.
त्यावर प्रतिक्रिया देताना एका युजर्सने लिहिले, “तुम्ही मालदीवचा फोटो टाकून भारतीय बेटांचा प्रचार करत आहात.” रणवीरची चूक काही नेटकऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रिनशॉट काढले आणि एकाने लिहिलं की, “रणवीर जे सुंदर बीच दाखवतोय ते मालदीवचं आहे.”
मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात अनेक अपमानजनक गोष्टी केल्या. अनेकांनी अपमानकारक पोस्ट शेअर केल्या. त्यानंतर भारत विरुद्ध मालदीव हा वाद सुरु झाला. तसेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अनेक भारतीयांनी मालदीवच्या फ्लाईटचे बुकींगच थेट रद्द केले. त्याचवेळी कंपन्यांनी आता लक्षद्वीप फिरण्यासाठी फ्लाईटच्या तिकीटांवर बंपर डिस्काऊंट दिलाय. त्यामुळे लोकांनी त्यांचे मालदीवची ट्रीप रद्द करुन लक्षद्वीपला पसंती दिली आहे.