मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज १८ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 1988 मध्ये जन्मलेल्या सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रतिभावान अभिनेत्री आणि स्टाईल आयकॉन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
सोनालीने 2007 मध्ये बकुळा नामदेव घोटाले या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2010 च्या नटरंग चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला व्यापक मान्यता आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाली. या चित्रपटाने सोनालीचे अष्टपैलुत्व अभिनेत्री म्हणून दाखवले आणि तिला मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थापित केले.
सोनालीचे सिनेसृष्टीत तसे अनेक मित्र मैत्रिणी आहेत. पण त्यातील तिची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे फुलवा खामकर. मनोरंजनसृष्टीत निखळ आणि चिरंतर मैत्रीची बरीच उदाहरणं आहेत. याच उदाहरणांपैकी एक म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर यांची मैत्री. ‘स.. सासूचा’ या चित्रपटासाठी दोघींनी एकत्र काम केलं होतं. पण त्यांची मैत्री विशेष खुलली ते ‘नटरंग‘ या चित्रपटाच्या सेटवर.
फुलवाने सोनालीला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. फुलवाने एक पोस्ट केली आहे, त्यात तिने दोघींचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यात फुलवाने लिहिले आहे, “सोनाली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा! सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा, कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं…
View this post on Instagram
मला ‘स् सासुचा ‘ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणा चा पहिला दिवस आठवतो… मी खूप घाबरलेली होते..मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे….कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं…फक्त घरचा अभ्यास करून गेले होते, कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगी पासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे… माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली !!…पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं,कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं , पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे…तू आहे तशीच आहेस… आणि ते सर्वांना नाही ग जमत….आजही आपल्यात काही बे बनाव झाला आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो ,खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो…. हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग? बाकी सगळं येत जात असतं नाही का??
सोनाली अशीच रहा..खूप आनंदी रहा…खूप छान काम कर…तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!!”