बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये ‘आमिर खान’ हे नाव आवर्जून घेतले जाते. त्याने अभिनय क्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.
आमिर खानने १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अभिनयला सुरुवात केली. त्याने अनेक लोकप्रिय सिनेमांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मिडियावर कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच आमिर खानच्या दोन्ही पत्नींचा एकत्र गप्पा मारतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अमीर खानने १९८६ मध्ये ‘रीना दत्ता’ सोबत पहिलं लग्न केलं होतं. रीना ही अमीरची शेजारी असल्याचं बोललं जायचं. जेव्हा अमिरने रीनाला प्रपोज केलं तेव्हा तिने त्याला साफ नकार दिला होता. पण पुढे ८० च्या दशकात ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच समजलं.
आमिरने एका मुलाखती दरम्यान त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितल. तो म्हणाला की, “मी रीनाशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. आमच्या बाजूने तीन साक्षीदार होते. रीनासोबतचं माझं लग्न सर्वांत किफायतशीर होतं, असं म्हणायला हरकत नाही. मी २११नंबरची बस पकडली आणि ५० पैशांची तिकिट काढली. वांद्रे पश्चिमला उतरून मी ब्रीजवरून पूर्वेला गेलो. तिथून मी हायवेच्या दिशेने चालत गेलो. हायवे ओलांडून मी गृहनिर्माण भवनात प्रवेश केला. तिथेच मॅरेज रेजिस्ट्रारचं ऑफिस होतं. अशा पद्धतीने माझं लग्न १० रुपयांच्या आत झालं होतं.”
View this post on Instagram
रीना व आमिर यांना दोन मूलं देखील आहेत. पण काही कारणांमुळे आमिर व रीना यांचा घटस्फोट झाला. त्याने बऱ्याचदा मुलाखतीमध्ये त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. घटस्फोटानंतर त्यांची दोन्ही मूलं रीना सोबत राहत असल्याचे त्याने सांगितले आहे. घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर किरणने आझाद या मुलाला जन्म दिला. तर २०२१ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला.
तो पुढे म्हणाला की, “रीना आणि मी १६ वर्षे सोबत होतो. जेव्हा आम्ही विभक्त झालो, तेव्हा तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रीना किंवा माझ्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर कमी झालेलं नाही.”